कॉंग्रेसला विश्वासातच घेतले जात नसल्याचा केला आरोप



ठाण्यातही महाविकास आघाडीत ठिणगी

कॉंग्रेसचे प्रदेश सदस्य राजेश जाधव यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीला धरले धारेवर

कॉंग्रेसला विश्वासातच घेतले जात नसल्याचा केला आरोप

 

ठाणे  :

 

मागील काही महिन्यापासून राज्यात महाविकास आघाडीत बिघाडी होत असून कोणत्याही निर्णय प्रक्रियेत समावून न घेतल्याने कॉंग्रेस पक्ष नाराज झाला आहे. आता तीच नाराज ठाण्यातही आता उघडपणे  समोर येऊ लागली आहे. एकीकडे राष्ट्रवादीने पर्यावरण मंत्री आदीत्य ठाकरे यांना पत्र देऊन आम्हालाही बोलावणे  करा अशी मागणी केली असून नाराजी व्यक्त केली आहे. परंतु कॉंग्रेसने आता शिवसेना आणि राष्ट्रवादीवर निषाणा साधत आम्हाला दोघांपैकी कोण सामावून घेतो असा सवाल उपस्थित केला आहे. कोवीड रुग्णालयाचा शुभारंभ तुम्हीच करता, पालिकेत काही शहराच्या दृष्टीकोणातून बैठकी होतात, त्यावेळेसही आम्हाला डावललेच जाते असा धक्कादायक आरोप कॉंग्रेसचे प्रदेश सदस्य राजेश जाधव यांनी केला आहे.

 

 कॉंग्रेसला शिवसेना, राष्ट्रवादीकडून वारंवार आमच्याकडून डावलले जाते, ठाण्यात कॉंग्रेसला विचारतच घेतले जात नाही. ज्या वेळेस शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्रित काम करत होते, तेव्हांही आम्हाला कोणी विश्वासात घेतले का? कोवीड हॉस्पीटलचा शुभारंभ, शहराच्या विकसाच्या दृष्टीने कोणी आम्हाला विचारत घेतले नाही. आम्ही देखील महाविकास आघाडीचाच घटक आहोत. आम्हाला देखील शहराची आणि येथील नागरीकांची काळजी आहे. परंतु वारंवार डावलून आमच्यावर हा अन्याय का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

 

राज्यात कॉंग्रेसच्या प्रदेश अध्यक्षांसह इतर मंत्र्यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे राज्यात महाविकास आघाडीत बिघाडी होऊ लागली आहे. आता ही बिघाडीची ही ठिणगी ठाण्यात येऊन पोहचली असून जाधव यांनी उपस्थित केलेल्या काही मुद्यांवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी आता तरी कॉंग्रेसला विश्वासात घेतील का? असा सवाल या निमित्ताने उपस्थित झाला आहे.